10 वी नापास झालात? तरी अकरावीत प्रवेश मिळणार, सरकारचा मोठा निर्णय, “या” दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार | 11th Admission Maharashtra In Marathi

11th Admission Maharashtra In Marathi आज आपण पाहणार की राज्य मंडळाचा दहावी बारावी बोर्डाचा निकाल लागलेला आहे यामध्ये दहावीच्या परीक्षेत काही मुलांना अपयश आलेले आहे तरी काळजी करू नका कारण तुम्हाला पुढील प्रवेश मिळणार आहे याबाबत काही नियम असतात या नियमांची माहिती आपण आज घेणार आहोत आणि पुढचा प्रवेश आपल्याला कसा मिळेल याविषयी माहिती बघूयात. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

11th Admission Maharashtra In Marathi

11th Admission Maharashtra संपूर्ण माहिती :

महाराष्ट्र राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल काय झाला यामध्ये भरपूर मुलांना चांगले यश मिळालेले आहे तर काही मुलांना अपयश झाले आहेत त्यामुळे आता शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या मुलांना परीक्षेत अपयश मिळालेले आहे जे मुला परीक्षेत नापास झालेले आहेत अशा मुलांना देखील आता अकरावीत प्रवेश मिळणार आहेत त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मला सांगतात आणि कोणत्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश मिळवता येईल आणि त्यानंतर त्यांना काय करावं लागतं प्रोसेस याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत

दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे कारण दहावीच्या परीक्षेचा तुम्ही नापास झाला असता तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आता पुढील प्रवेश प्रक्रिया ही सुरळीत होईल आणि तुमचं शैक्षणिक नुकसान देखील होणार नाही याविषयी आपण माहिती बघूया.

दहावी नापास झालेला विद्यार्थी अकरावीला कसा घेईल प्रवेश?

तसेच दहावीसाठी ATKT लागू केली आहे. जर एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाला तरी त्याला 11 वीमध्ये प्रवेश दिला जातो. याला allowed to keep terms म्हणजेच ATKT दिली जाते. यानुसार तो विद्यार्थी अकरावीत ऍडमिशन घेऊ शकतो. मात्र बारावीत प्रवेश घेण्यापूर्वी त्याला दहावी उत्तीर्ण होणे गरजेचे असेल. हा विद्यार्थी जून-जुलैची २०२५ किंवा फेब्रुवारी मार्च २०२६ ची परीक्षा जर तो उत्तीर्ण झाला आणि अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाला तर तो बारावी परीक्षेला प्रवेश घेण्यास पात्र ठरु शकतो, असेही शरद गोसावींनी म्हटले.

11th Admission Maharashtra

“या” दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार :

शिक्षण विभागाने यंदापासून ११ वीची प्रवेश प्रक्रिया (11th Admission Maharashtra In Marathi) ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याची प्रक्रिया 19 मेपासून सुरू होत आहे, तर 11 वीचे वर्ग 11 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी ही माहिती दिली.

अकरावीसाठी ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया यापूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, पिंपरी-चिंचवड या शहरात राबवली जात होती. आता राज्यभर 11 वी प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे. मात्र, केवळ राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा- महाविद्यालयांसाठीच ती राबवली जाणार आहे.

विद्यार्थांनी ऑनलाईन अर्ज भरताना 10 पसंती क्रमांक द्याचे आहेत. ती प्रक्रिया 28 मे पर्यंत सुरु राहील त्यानंतर प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होतील व पाचवी फेरी खुल्या पद्धतीने गुणवतेवर राबवली जाईल. या फेऱ्याच्या तारखा अदयाप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. गुणवतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी यंदापासून हि पद्धत अवलंबली जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ दहावी पास झालात, 10 वी नंतर काय करावे? “या” ऑप्शनचा करा विचार, पहा संपूर्ण डिटेल्स

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment