Maharashtra Land Ceiling Act Agricultural Land Seizure Rule महाराष्ट्रातील शेतकरी आणि गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. शेत जमीन खरेदी करताना महाराष्ट्र कृषी जमीन (धारण मर्यादा) अधिनियम,1961 अंतर्गत असलेल्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास तुमची शेतजमीन शासनाकडून जप्त केली जाऊ शकते.
Maharashtra Land Ceiling Act Agricultural Land Seizure Rule संपूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात शेत जमिनीची खरेदी विक्री सुरु असताना, अनेक नागरिक या कायद्यांसंदभार्त अनभिद्य्न असतात. 1961 साली अस्तित्वात आलेल्या या कायद्याच्या मुख्य उद्देश म्हणजे शेत जमीन काही मोजक्या मोठया जमीनदारांकडे केंद्रित होऊ न देता, गरजू व भूमिहीन शेतकऱ्यांनाही शेत जमीन खरेदीची संधी मिळावी हा आहे.
धारण मर्यादा कायद्यानुसार जमीनीच्या प्रकारानुसार मर्यादा :
- दोन पिकांसाठी सिंचित जमीन : कमाल 18 एकर
- एक पीक घेणारी सिंचित जमीन : मर्यादा 27 एकर
- असिंचित जमीन : कमाल 36 एकर
- कोरडवाहू जमीन (पावसावर आधारित) : कमाल 54 एकर
कायद्याचे उल्लंघन – गंभीर परिणाम
अधिक जमीन बेकायदेशीरपणे खरेदी केल्यास महसूल विभाग चौकशी करून जमीन जप्त करू शकतो. विशेष म्हणजे अशा वेळी गुंतवलेली रक्कमही परत मिळण्याची शक्यता अत्यल्प असते.
शेतकरी आणि गुंतवणूकदारांनी कोणतीही शेत जमीन खरेदी करण्यापूर्वी या कायद्याची (Maharashtra Land Ceiling Act Agricultural Land Seizure Rule) माहिती घ्यावी आणि मर्यादांचे पालन करावे, अन्यथा नुकसान आणि जमिनीच्या जप्तीचा धोका संभवतो.
डिस्क्लेमर : Maharashtra Land Ceiling Act Agricultural Land Seizure Rule या लेखातील माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. अचूक माहिती संबंधित शासकीय अधिकृत स्रोतांकडून तपासून घ्यावी. कोणताही निर्णय घेताना स्वतःची जबाबदारीने कृती करावी.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |