केंद्राचा 1 नंबर निर्णय; आता कन्फर्म तत्काल तिकीट मिळवणे झालं सोप्प, “या” लोकांनाच तत्काल तिकीट मिळणार ! Indian Railways Confirmed Tatkal Ticket

Indian Railways Confirmed Tatkal Ticket भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ई-आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. बनावट अकाउंट्सवर कारवाई होणार असून, आधार लिंक केलेल्यांनाच प्राथमिकता मिळणार आहे. यातून खरे प्रवासी तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरणार आहेत.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Railways Confirmed Tatkal Ticket

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने नवे निर्णय घेत असते. आता ‘तत्काल तिकीट’ बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे की, लवकरच तत्काल तिकीट बुक करताना ई-आधार प्रमाणीकरण आवश्यक केले जाईल. या निर्णयामुळे खऱ्या प्रवाशांना त्यांच्या गरजेच्या वेळी कन्फर्म तिकीट मिळवणे सुलभ होणार आहे.

ई-आधार प्रमाणीकरण का गरजेचे?

रेल्वेच्या आकडेवारीनुसार दररोज सुमारे 2.25 लाख प्रवासी IRCTC च्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तत्काल तिकीट बुक करतात. मात्र, अनेकदा हे तिकीट दलालांकडून ताब्यात घेतले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच आता आधार ई-व्हेरिफिकेशन अनिवार्य करून ही प्रक्रिया पारदर्शक केली जात आहे.Indian Railways Confirmed Tatkal Ticket

हेही वाचा : क्लिक करा ⇒ खुशखबर; आजपासून लाडकी बहीण मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरवात, “या” महिलांना पैसे वाटप सुरु

रेल्वे मंत्रालयाच्या निरीक्षणानुसार, AC क्लासमधील तिकीट बुकिंगचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे :

वेळ  AC वर्ग बुक झालेले तिकीट 
पहिला मिनिट  5,615 तिकीट 
दुसरा मिनिट  22,827 तिकीट
10 मिनिटांमध्ये 67,159 तिकीट (62.5%)

 

इतर 37.5% तिकीट नंतरच्या वेळेत बुक झाली असून, काही तिकीट खिडकी खुल्या झाल्यानंतर 10 तासांनंतरही बुक झाली आहेत. यावरून स्पष्ट होते की, अनेक दलाल अनेक अकाउंट्सद्वारे तिकीट बुक करत आहेत.

नॉन-एसी श्रेणीतील बुकिंगचा अभ्यास

24 मे ते 2 जून या कालावधीत नॉन-एसी श्रेणीत दररोज सरासरी 1,18,567 तिकीट ऑनलाइन बुक करण्यात आली. यामध्ये:

वेळ  AC वर्ग बुक झालेले तिकीट 
पहिला मिनिट  4,724 तिकीट (4%)
दुसरा मिनिट  20,786 तिकीट (17.5%)
10 मिनिटांमध्ये 66.4% तिकीट 
1 तासात  84.02% तिकीट

 

ह्या आकडेवारीवरून हे लक्षात येते की, प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये बुकिंग करणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यामुळेच सत्यापन झालेल्या खात्यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे.

बनावट अकाउंट्सवर कारवाई 

रेल्वेच्या माहितीनुसार सध्या IRCTC वेबसाइटवर 13 कोटीहून अधिक सक्रिय युजर्स आहेत, मात्र त्यातील फक्त 1.2 कोटी अकाउंट्सच आधार-सत्यापित आहेत. उर्वरित असत्यापित आणि सुमारे 20 लाख संशयास्पद अकाउंट्सवर तपास सुरू आहे.

जर एखादा युजर त्याचे अकाउंट आधारशी लिंक करत नसेल किंवा तो बनावट वाटत असेल, तर त्या युजरचे IRCTC खाते बंद करण्यात येईल. यामुळे खरी गरज असलेले प्रवासीच तिकीट बुक करू शकतील आणि दलालांवर नियंत्रण ठेवता येईल.Indian Railways Confirmed Tatkal Ticket

हेही वाचा : क्लिक करा ⇒ ब्रेकिंग न्यूज; घरकुल योजना फॉर्म मुदतवाढ, 02 लाख अनुदानासाठी “या” पद्धतीने नोंदणी करा

तत्काळ बुकिंगमध्ये मिळेल प्राधान्य

रेल्वेने स्पष्ट केले आहे की, ज्यांचे अकाउंट्स आधारशी लिंक असतील त्यांना तत्काळ तिकीट खरेदीच्या पहिल्या 10 मिनिटांमध्ये प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे भविष्यात प्रवास करण्याची योजना असेल, तर तुमचे IRCTC खाते लवकरात लवकर आधारशी लिंक करा.

डिस्क्लेमर: Indian Railways Confirmed Tatkal Ticket वरील लेखात दिलेली माहिती ही रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. अधिकृत निर्णय व प्रक्रिया जाणून घेण्यासाठी कृपया IRCTC किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment