रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, 28 फेब्रुवारी पर्यंत ई- केवायसी पूर्ण करा, न केल्यास अनुदान बंद | KYC Mandatory Before 28 February 2025

KYC Mandatory Before 28 February 2025 महाराष्ट्रातील ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप ई-केवायसी (E KYC) प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे राशन वाटप थांबवण्याची तयारी शहर व जिल्हा पुरवठा विभागाने केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि शहरी पुरवठा अधिकारी यांनी सांगितले आहे कि, सर्व जिल्ह्यातील 1904 शासकीय राशन दुकानदारांच्या माध्यमातून सर्व रेशन कार्डधारकांना 28 फेब्रुवारी 2025 पूर्वी ई-केवायसी प्रकीर्णय पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आली आहेत.  सदर माहिती इतरांना पण शेअर करा जेणे करून ते सुद्धा ई-केवायसी प्रकीर्या पूर्ण करतील. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

KYC Mandatory Before 28 February 2025

अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थींनी धान्य घेत वेळी कुटुंबातील सर्व सदस्यास सह नजीकच्या रेशनिंग दुकानातून 28 फेबुवारी 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. सर्व शिधावाटप दुकानांमध्ये ई-पॉस मशीनवर आधार प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

शिधापत्रिका सोबत संल्गन करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद असल्येल्या व्यक्ती त्याच आहेत, याची खात्री करण्यासाठी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) होणे आवश्यक आहे. त्याआधारे शिधापत्रिकेमध्ये योग्य व्यक्ती असल्याची खात्री होणार आहे.

KYC Mandatory Before February 28 

ज्या शिधाधारकांचे अंगठे स्कॅन होत नाहीत, त्यांच्यासाठी डोळ्याच्या पापणी स्कॅनिंगची सुविधा सर्व राशन दुकानांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा, ठरलेल्या कोट्यानुसार त्यांचे राशन मिळणे बंद होईल, यासाठी संबंधित लाभार्थी स्वतः जबाबदार असतील. 

सर्व राशन दुकानांमध्ये आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) मोहीम राबविण्यात येत आहे. ई-केवायसी करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. तसेच कोणत्याही राशन धान्य दुकानातून ई-केवायसी करता येणार आहे. ई-केवायसी न केल्यास भविष्यामध्ये अन्न सुरक्षा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याचेहि अधिकाऱ्यांनी पत्रक जारी केले आहे. 

(KYC Mandatory Before 28 February 2025) सध्या जिल्ह्यात अंत्योदय योजनेअंतर्गत 1 लाख 28 हजार 207 राशन कार्डधारक आहेत, ज्यांचे एकूण लाभार्थी संख्याश 4 लाख 78 हजार 548 आहे. त्याचप्रमाणे प्राधान्य गटात 3 लाख 74 हजार 335 कार्डधारक असून, 15 लाख 12 हजार 130 लाभार्थी आहेत. अशा एकूण 19 लाख 10 हजार 678 लाभार्थ्यांना दरमहा 1,904 सरकारी रेशन दुकानांमधून मोफत धान्य दिले जाते.

शिधाधारकांनी काय करावे?

  • आधारकार्ड बँक खात्याशी आणि मोबाइल नंबरशी लिंक करावे. 
  • राशन दुकानात स्वतः हा जाणून ई-केवायसी करून घ्याची आहे. 
  • 28 फेबुवारी 2025 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. 
  • ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर सदर रेशन कार्ड बंद होणार आहे. KYC Mandatory Before 28 February 2025

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ Mhada News ; स्वस्तात घर खरेदी करण्याची पुन्हा एकदा संधी, म्हाडा मंडळाच्या घरांची लॉटरी जाहीर

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA सदनिकांसाठी निवड यादी जाहीर, एकदम किंवा टप्याटप्याने भरा रक्कम, या तारखेपर्यंत मुदत.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || KYC Mandatory Before 28 February 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment