Monsoon Maharashtra Update 2025 दक्षिण -पश्चिम मान्सून यंदा नेहमीच्या वेळेपेक्षा लवकरच देशात दाखल झाला असून, आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरु झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या दोन -तीन दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या काही भागापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Monsoon Maharashtra Update 2025
केरळात यंदा 25 मे रोजीच मान्सून दाखल झाला, जो 2019 नंतरचा सर्वात लवकर आगमनाचा दिवस ठरला आहे. नेहमी साधारणतः 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो . यंदा अनुकूल हवामानामुळे हि प्रक्रिया लवकर झाली आहे.
कोकणातील रत्नागिरी परिसरात कमी दाबाचा पत्ता तयार झाल्यामुळे मान्सून पुढे सरकण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्ल्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तर रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी सध्या कोणताही विशेष इशारा दिला गेलेला नसला तरी हवामान विभाग परिथितीवर सतत लक्ष ठेऊन आहे.
Monsoon Maharashtra Update
दरम्यान, केरळमध्ये मान्सून 24 मे रोजीच दाखल झाला असून, यंदा तो ८ दिवस आधीच पोहोचला आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवातेही जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राजधानी दिल्लीत रविवारी उशिरा रात्री जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाणे उशिरा झाली आहे. तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बीड, पुणे नाशिक, अहिल्यानगर, पालघर या भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रच्या “या” नवीन कायद्याचे उल्लंघन केल्यास सरकारकडून तुमची जमीन जप्त होणार ! जाणून घ्या नवीन कायदा
हेही वाचा : चांगला निर्णय, म्हाडाने घरांच्या किंमती कमी केल्या | सुमारे 1.50 लाखापर्यंत सूट
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |