PM Ujjwala Yojana Free Gas Connection देशातील ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटूंबातील महिलांना धुरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची (PM Ujjwala Yojana) सुरुवात केली होती. पारंपरिक इंधनचा वापर करत स्वयंपाक करणाऱ्या महिलां स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्धिष्ट आहे. या योजने अंतर्गत सरकार पात्र महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन आणि पहिला गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देते.
PM Ujjwala Yojana Free Gas Connection
अनेक महिलांना अजूनही या योजनेची संपूर्ण माहिती नाही, विशेषतः योजनेसाठी पात्रता काय आहे हे अनेकांना ठाऊक नसते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम महिलांनी पात्रतेच्या अटी समजून घेणे आवश्यक आहे. उज्ज्वला योजनेचा लाभ फक्त महिलांसाठी आहे. पुरुषांना या योजने अंतर्गत लाभ मिळत नाही. महिलांची वयोमर्यादा किमान 18 वर्ष असावी लागते. आणि त्या महिला बीपीएल कुटूंबातील असावे.
PM Ujjwala Yojana Free Gas Connection प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी घरामध्ये आधीपासून एलपीजी गॅस कनेक्शन नसणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करताना आधारकार्ड, पत्ता पुरावा, बँक खाते तपशील आणि संबधीत राज्य सरकारने जारी केलेले रेशन कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता असते. हि सर्व कागदपत्रे नसल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
PM Ujjwala Yojana Free Gas Connection महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी https://pmuy.gov.in/ या अधीकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज प्रक्रिया खूप सोपी असून, पात्र लाभार्थ्यांना योजनेचा सहज लाभ मिळवता येतो. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा फायदा घेतला असून त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून आला आहे. स्वच्छ इंधनामुळे आरोग्य महिलांचे सुधारले असून, धुरामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही कमी झाले आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana; लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी रुपये वितरण, आदेश जारी “या” दिवशी पैसे बँक खात्यात जमा होणार
हेही वाचा : सरकारचा धमाका; 35 लाख घरांची लॉटरी, “या” नागरिकांना मिळणार हक्काचे घर, पहा योजनेची संपूर्ण माहिती
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
डिस्क्लेमर : PM Ujjwala Yojana Free Gas Connection या लेखातील माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. योजनेची अचूक माहिती संबंधित शासकीय अधिकृत स्रोतांकडून तपासून घ्यावी. कोणताही निर्णय घेताना स्वतःची जबाबदारीने कृती करावी.