Vihir anudan yojana 2025 Last Date शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. पाणी उपलब्ध नसल्यास शेतीत चांगले उत्पादन घेणे कठीण होते. महाराष्ट्रातील अनेक भागांत अजूनही पाण्याची कमतरता जाणवत असल्याने सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदण्यासाठी, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी, शेततळे अस्तरीकरण तसेच ठिबक सिंचन यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईवर मात करून शेतीसाठी पाणी साठवता येते.
Vihir anudan yojana 2025 Last Date
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर खोदायची आहे त्यांना सरकार 2.5 लाख रुपये अनुदान देणार आहे. vihir Anudan Yojana या योजनेला विहीर अनुदान योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतामध्ये नवीन विहीर खोदू शकतो. जेणेकरून त्याचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.
विहीर अनुदान योजना साठी पात्रता :
- शेतकऱ्याकडे सलग एक एकर शेती असणे आवश्यक आहे.
- पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पासून 100 मीटर पर्यंत अंतर असणे आवश्यक आहे.
- दोन विहिरीमध्ये 250 मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीय व दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी हा नियम नाही.
- सातबारावर यापूर्वी विहिरीची नोंद नसावी.
- याबरोबरच अर्ज शेतकरी हा जॉब कार्डधारक असावा. तरच मनरेगा अंतर्गत या योजनेचा लाभ घेता येतो.
सदर योजनांचा या शेतकऱ्यांना मिळणार लाभ :
अनुसूचित जाती, जमाती, भटक्या व विमुक्त जातीतील शेतकरी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्र रेषेखालील कुटुंबे, महिला, कर्त्या असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती करता असलेले कुटुंब, जमीन सुधारण्याच्या लाभासाठी इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी(2.5 एकर पर्यंत जमीन) असणे आवश्यक आहे. या घटकातील सर्वांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.Vihir anudan yojana 2025 Last Date
या योजनेतून इतके मिळणार अनुदान :
शेतकऱ्यांसाठी पाणी व्यवस्थापनास मदत करण्यासाठी सरकार विविध योजनांअंतर्गत अनुदान देते. नवीन विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना 2.5 लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. इन-वेल बोरिंगसाठी 20,000 रुपये आणि पंप संच खरेदीसाठी 20,000 रुपये मिळतात.
वीज जोडणीसाठी 10,000 रुपये तर शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपये दिले जातात. ठिबक सिंचनासाठी 50,000 रुपये व तुषार सिंचनासाठी 25,000 रुपयांपर्यंत मदत उपलब्ध आहे. तसेच, पीव्हीसी पाईपसाठी 30,000 रुपये आणि परसबाग योजनेसाठी 500 रुपयांचे अनुदान दिले जाते.Vihir anudan yojana 2025 Last Date
Vihir anudan yojana 2025 apply online
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाइन भरता येतो.
- यासाठी सर्वप्रथम अर्जदाराने महा डीबीटी महाइत या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- तिथे स्वतःची नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागते.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर अर्जदाराने लॉगिन करून संबंधित योजनेचा पर्याय निवडावा.
- त्यानंतर ज्या अनुदानासाठी अर्ज करायचा आहे, तो पर्याय निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
- अर्ज सबमिट केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे असते. शेवटी, अर्जाची स्थिती वेळोवेळी वेबसाइटवर तपासता येते.
इतर सरकारी योजनांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Vihir anudan yojana 2025 Last Date