1 एप्रिल पासून ‘जिवंत सातबारा मोहीम’ वारसदारांसाठी मोठी बातमी, मोहीम नेमकी आहे तरी काय? Jivant Satbara Mohim Maharshtra

Jivant Satbara Mohim Maharshtra सातबाऱ्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सातबाऱ्यावर आता सर्व मृत खातेदारांऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहेत. यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जिवंत सातबारा मोहीम'(Jivant Satbara Mohim Maharashtra) राबवण्याचे आदेश महसूल मंत्री यांनी दिले आहेत. ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 10 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारे अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आलीय. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Jivant Satbara Mohim Maharshtra

1 एप्रिल 2025 पासून राज्यभरात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे.

सध्या बुलढाण्यात सुरु असलेली जिवंत सातबारा मोहीम आता 1 एप्रिल 2025 पासून राज्यभरात राबवली जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत सातबारा उताऱ्यावर असणाऱ्या गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी होणार आहेत. त्या ऐवजी आता वारसांची नावे लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेले आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद नसल्यामुळे बऱ्याचदा जमीन व्यवहारांमध्ये अनेकांना अडचणी येतात. त्यामुळे राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम रावबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

‘जीवन सातबारा मोहीम’ कशी असणार आहे?

जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी गावात वाचन करतील. या वाचनादरम्यान न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मृत खातेदारांची यादी तयार करण्यात येणार आहे. 

06 ते 20 एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठ्यांकडे सादर करता येतील.
स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई -फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील.
२१ एप्रिल ते १० मे या कालावधीत तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये मृत खातेदारांऐवजी वारसाचे नाव नोंदवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत .
त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून मृत व्यक्तीच्या ऐवजी वारसा व्यक्तीचे नाव सातबारावर येईल असेही सांगण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत समन्वय अधिकारी म्हणून तहसीलदारांची तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वारसांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर तोडगा
जेणेकरून मयत व्यक्तीच्या ऐवजी सातबारावर जिवंत व्यक्तींची नावे येतील.Jivant Satbara Mohim Maharshtra

 

Jivant Satbara Mohim | आवश्यक कागदपत्रे 

वारसनोंद साठी लागणारे कागदपत्रे :

  • वैद्य माहितीसह भरलेला फॉर्म
  • घराच्या नोंदणीचा व पत्याचा पुरावा
  • कोर्टाचा स्टॅम्प
  • राशन कार्ड
  • वारसदारांचा प्रतिज्ञापत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदारांना ओळखपत्र (आधारकार्ड)
  • मृत्यू दाखला
  • मयत व्यक्ती शासकीय सेवेत असल्यास त्याबाबतची सेवा पुस्तिका आणि सक्षम अधिकारी यांच्याकडील सेवा समितीचे पत्र

मोहिमेचा लाभ : 

  • हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर वारस हक्क सहज मिळेल.
  • सरकारच्या कृषी आणि अर्थसहाय्य योजनांचा लाभ सहज मिळेल.
  • जमिनीच्या व्यवहारांची पारदर्शकता वाढेल आणि अनधिकृत हस्तांतरण थांबेल.Jivant Satbara Mohim Maharshtra

जिवंत सातबारा मोहिमेचा फायदा : 

  • सातबाऱ्यावर नवीन मालकांची नोंद झाल्याने मालमत्ता व्यवहार सोपे होतील.
  • वारसांना बँक कर्ज, तुकडाजोड प्रकरणे आणि खरेदी-विक्री व्यवहारात अडचण येणार नाही.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेणे सहज शक्य होणार. 
  • सरकारी योजना व अनुदानांसाठी अर्ज करताना अधिकृत मालकत्वाची नोंद उपयुक्त ठरेल.Jivant Satbara Mohim Maharshtra
इतर सरकारी माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment